दर्यापूर (प्रतिनिधी)
दर्यापूर शहरात महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर असून, वीज वितरण विभागाने जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती सुरु केली आहे. या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ झाल्याची तक्रार नागरिक करत असून, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा पडत आहे.
यासोबतच, पावसाळ्यातील या काळात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजूला स्मार्ट तंत्रज्ञान लावण्याचा आग्रह आणि दुसरीकडे मूलभूत सुविधा असलेला अखंड वीजपुरवठाही देण्यात अपयशी ठरणाऱ्या महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना दर्यापूर तालुका शाखेने दिला आहे.
यासंदर्भात महावितरण कार्यालय, दर्यापूर येथे निवेदन देण्यात आले. हे निवेदन शिवसेना (शिंदे गट) संपर्कप्रमुख अमरावती जिल्हा गजू पाटील वाकोडे तसेच युवासेना जिल्हाप्रमुख पितेश अवघड यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना तालुकाप्रमुख संतोष ठाकरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
निवेदनप्रसंगी उपस्थित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते:
अमित कांबे (तालुका संघटक), भूषण राऊत (उपतालुकाप्रमुख), अमन भदे, विकास साखरे, सतीश कुटेमाटे, दीपक मुगणे (सर्कल प्रमुख), सोपान नरोकार, बंटी गोळे, तुळशीदास साखरे, गणेश अमलकर, मंगेश सांगोले, सोपान मानकर, मुबारक अली, अमोल गावंडे, नितीन भदे, वैभव देशमुख, रविंद्र खाळे, अजय कडु, विलास जामनिक, धीरज तराळ, गणेश देशमुख, तेजस शिंदे, शिवम ढोरे, दर्पण टाले, भूषण गोठे, ओम बारस्कर, शरद कीलोर, दिनेश तेलंग, निलेश गावंडे, निरंजन पानझाडे, दीपक डायलकार आदी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
